After Covide College Life

भारतासह जगभर कोव्हीड १९ ने हैदोस घातलेला दिसून येतो. याचा मोठा परिणाम सध्या शैक्षणिक क्षेत्रावर झालेला दिसून येतो. कारण आता शाळा महाविद्यालये सुरु होण्याचा काळ आहे. त्यानिमित्ताने शालेय साहित्य निर्मिती , विक्री, प्रवेश इ. मुळे निर्माण होणारा रोजगार व आर्थिक चक्र बंद पडले आहे. माझी काही शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींशी फोनवरून चर्चा झाली तर दरवर्षी त्यांना या मे आणि जून मध्ये फार मागणी असते पण सध्या ते एप्रिल पासून आपली वाहने उभी करून आहे आणि साधारणपणे अजून ४ महिने तरी त्यांना कुठलेही काम मिळणार नाही. त्यामुळे कोव्हीड नंतर शाळा व महाविद्यालयांची स्थिती कशी असेल .

माझ्या मते,

१. सर्व विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेऊन तृप्त होणार नाही. त्यांच्या सर्व शंकाचे ऑनलाइन निरसन शक्य नाही.

२. सर्व विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये बोलावणे विद्यार्थी व शिक्षक यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातकच आहे.

३. सम – विषम सूत्राने शाळा महाविद्यालये सुरु केल्यास सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरण यांवर खूप पैसा खर्च करावा लागणार आहे.

४. हे सर्व करूनही प्रादुर्भाव झाल्यास जबाबदार कोण ? हा मोठा प्रश्न आहे.

५. महाविद्यालय स्तरावर मुले मोठी असल्याने ते सामाजिक अंतर राखतील अशी अपेक्षा आहे, पण लहान मुलांकडून हि अपेक्षा करणे चुकीचे आहे.

६. मुळात लहान मुलांवरील पूर्वीचेच ओझे (burdan) खूप असल्याने अजून कोरोनाचे ओझे वाढविणे योग्य नाही.

तात्पर्य :

१. शाळा, महाविद्यालये सुरु करण्याची घाई करू नये. शैक्षणिक वर्ष जून – मे ऐवजी बदलून घेता येईल.

२. भविष्यकाळातील सुट्ट्या रद्द केल्या तरी शैक्षणिक नुकसान सहज टाळता येईल.

३. घाईघाईने शैक्षणिक नुकसान असले शब्द वापरून विद्यार्थांना कोरोनाच्या खाईत लोटू नये.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started